आपल्याकडे कुठलीही पूजा केल्यानंतर त्या देवाची आरती करण्याची प्रथा आहे त्या दृष्टीने गणपती व इतर देवांच्या आरत्या केल्या जातात प्रत्येक आरती नंतर देवळा भोवती प्रदक्षिणा घालणे याला भोवत्या म्हणतात ही प्रथा कोकणात रूढ आहे प्रत्येक आरती नंतर फेरी घालताना त्या देवाचा गजर करीत फेरी घालतात देवासमोर आल्या नंतर एखादे पद अगर अभंग म्हटला जातो व मग दुसऱ्या देवाची आरती म्हटली जाते असे साधारण आपल्याला जेवढया आरत्या म्हणावयाच्या असतील तेवढ्या वेळ फेऱ्या होतात.