रत्नागिरी शहरामध्ये जन्म ज्याचा
झाला
बाळ गंगाधर नांव ठेविले
त्याला
विद्याभ्यास याने बहुतची
केला ।
विष्णूशास्त्र्यानी गुरू
मंत्र दिला ॥ १
॥
जय देव जय देव जय विघ्नहरा
।
आरती ओवाळू बाळ गंगाधरा ॥ धृ ॥
मानवरूप धरूनी बळवंत आला ।
थोर पराक्रम बाळाने केला ।
देश बांधवासी याने दाविला ।
तिन्ही लोकी ज्याचा झेंडा
लागला ।। २ ॥
संसारी असूनी विरक्त झाला ।
देशासाठी ज्याने देह
झिजविला ।
काळेपाणी-कारागृह ज्याने सोशिला ।
सुख दुःख सर्व समान त्याला
।। ३ ।।
जानकी मूढमतीने केले कवन ।
नसे मज बुध्दी आणि लेखन ।
जगी सर्व दुःखी झाले ते जन
।
टिळक स्वर्गी गेले आमुचे
निधान ॥ ४ ॥
(वि.सू. सदर आरती माझ्या पणजी कै. जानकी घुले-अभ्यंकर यांनी रचली आहे.)